*युवकांनी केवळ व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तीमत्व विकास घडवा.डॉ.विश्वनाथ आवाड*
संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)माळशिरस तालुक्यातील मौजे चाकोरे येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या “युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास* विशेष श्रमसंस्कार शिबीरात युवकांना मार्गदर्शन करताना डॉ.विश्वनाथ आवाड बोलत होते. ते पुढे म्हणाले की,तरूणांनी आदर्श जीवन जगण्यासाठी निर्णय क्षमता,भावनांवर नियंत्रण,तटस्थता आणि वस्तुस्थिती विचारात घ्यायला हवा.आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवीत समोरच्या व्यक्तीच्या दोन्ही बाजू ऐकून घ्यायला पाहिजेत. आयुष्याच्या वाटचालीत काही गोष्टी सोडून दयायला शिकता आले पाहिजे.आयुष्यात बदनामी होईल ती स्विकारता यायला हवी कारण कारण आयुष्यातले काही प्रसंग आपल्याला आणखी मजबुत करण्यासाठीच येतात. स्वताच आत्मपरीक्षण करा, आपले चांगले गुण तपासा चुकीचे गुण बाजूला करा.समाजाच सभोतालचे निरीक्षण करा.संगीत ऐका,लिहा,वाचा निर्सग अनुभवा. चुक झाली तर मान्य करा,आणि आयुष्यात दोन मित्र जे योग्य सांगतील ते ठेवा.समाज माध्यमांचा वापर करताना केवळ प्रतिक्रीया वादी न होता भुमीकावादी व्हा.केवळ व्यक्ती बनण्यापेक्षा व्यक्तीमत्व बना. यावेळी ॲड.चंद्रकांत शिंदे, सरपंच नवनाथ जाधव, उपसरपंच सचिन कचरे, किरण भांगे,सागर वरकड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सविता सातपुते, डॉ.सज्जन पवार, डॉ.दत्ता मगर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.पुजा जाधव हिने केले.सूत्रसंचलन कु.ऋतुजा ससाणे,कु.स्नेहल मगर यांनी केले तर आभार सिध्दी मगर हिने मानले.




